जमीन आधी की पाणी? कशी झाली पृथ्वी निर्माण

पृथ्वीची निर्मिती होताना आधी भूभाग तयार झाला का महासागर याबाबत अनेक मतेमतांतरे आहेत. पृथ्वीवरील भूभाग म्हणजेच खंड हे महासागरांच्या अडीच अब्ज वर्षांआधी निर्माण झाले असल्याचा दीर्घकालिन समज आहे; पण भारत, अमेरिका अणि ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी मात्र महासागरांचे अस्तित्व भूभागांच्या ७०० दशलक्ष वर्ष आधी निर्माण झाले असल्याचे अनुमान काढले आहे.

‘नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी याबद्द्लचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून त्यात ‘ही घटना खूप पूर्वी – ७०० दशलक्ष वर्षांपूर्वी घडली होती.’ असे म्हटले आहे. ‘द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील पेपरमध्ये, संशोधकांनी म्हटले आहे की, ‘पृथ्वीची निर्मिती होण्याआधी ब्रह्मांडातील घडामोडी पहिल्यांदा केव्हा आणि कशा घडल्या, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी अस्तित्वात येण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याबाबत वादविवाद असले तरी, व्यापक एकमत असे आहे की ३.३ ते ३.२ अब्ज वर्षांपूर्वी (म्हणजे, बहुतेक मॉडेलच्या अंदाजापेक्षा ७०० दशलक्ष वर्षांपूर्वी) समुद्रसपाटीपासून स्थिर महाद्वीपीय भूभाग उदयास येऊ लागले हे दाखवण्यासाठी काही संशोधन केले गेले.”

संशोधकांचा असा विश्वास आहे की हा भूभाग म्हणजे आताचा झारखंडमधील सिंहभूम प्रदेश आहे. टीमने 3 अब्ज वर्षांपूर्वीच्या प्राचीन नद्या, भरती-ओहोटी आणि समुद्रकिनारे यांच्या वाळूच्या खडकांचे विश्लेषण केले, त्या संशोधनातून येथील कवच हे हवेच्या संपर्कात आलेले सर्वात जुने असल्याचे सिद्ध झाले. अभ्यासाचे प्रमुख लेखक शास्त्रज्ञ प्रियदर्शी चौधरी सांगतात, “आम्हाला सँडस्टोन नावाचे विशिष्ट प्रकारचे गाळाचे खडक सापडले. त्यानंतर आम्ही त्यांचे वय आणि ते कोणत्या परिस्थितीत तयार झाले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला.

आम्ही युरेनियम आणि लहान खनिजांच्या शिशाच्या सामग्रीचे विश्लेषण करून वय शोधले. हे खडक ३.१ अब्ज वर्षे जुने आहेत आणि ते प्राचीन नद्या, समुद्रकिनारे आणि उथळ समुद्रात तयार झाले होते. हे सर्व पाणवठे केवळ खंडप्राय जमीन असल्यावरच अस्तित्वात असू शकले असते. अशा प्रकारे, ३.१ अब्ज वर्षांपूर्वी सिंहभूम प्रदेश हा महासागराच्या वर होता असे आम्ही अनुमान काढले आहे. सिंहभूमच्या बाबतीत, कवचाखालील मॅग्माच्या गरम प्लम्समुळे क्रॅटॉनचे काही भाग घट्ट झाले आणि ते सिसिलिया आणि क्वार्ट्ज सारख्या हलक्या वजनाच्या पदार्थांनी समृद्ध झाले. या प्रक्रियेनेमुळे सभोवतालच्या घनदाट खडकाच्या तुलनेत, जमिनीचे वस्तुमान पाण्याच्या वर आणि बाहेर आले. प्रारंभिक पृथ्वीवरील महासागरांना या आवश्यक पोषक द्रव्यांचे वितरण सर्वात जुने जीवन स्वरूप स्थापित करण्यासाठी आणि राखण्यासाठी महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे पहिल्या भूभागाचा उदय ही आपल्या ग्रहाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती.’’