Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत यश मिळविण्यासाठी अशा चुका टाळा

लोकसेवा आयोगाच्या अर्थातच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहे, या परीक्षेत उमेदवार सामन्यात : ज्या चुका करतो, त्यांची माहिती घेऊ म्हणजे त्या टाळता येतील.

  1. माहिती आणि आशयाची कमतरता

जर उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे अगदी सामान्य उत्तर दिले तर त्याला/तिला सामान्य गुण मिळतील. दुसरीकडे, जर तुम्हाला चांगले उत्तर लिहायचे असेल तर, तथ्ये, डेटा आणि उदाहरणांसह उत्तर द्या.

  1. लेखन सरावाचा अभाव:

या परीक्षेत “चांगले उत्तर लिहिण्यास सक्षम होण्यासाठी तुमच्याकडे लेखनाचा पुरेसा सराव असणे आवश्यक आहे”. या परीक्षेसाठी लेखन क्षमतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून तुम्ही परीक्षेदरम्यान तुमची उत्तरे जलद लिहू शकाल. अनेकदा उमेदवारांमध्ये लेखनाचा सराव नसतो.

  1. दृष्टिकोनाचा अभाव :

बर्‍याच UPSC /CSE टॉपर्सने सांगितले कि ही परीक्षा म्हणजे तुमच्या ज्ञानाच्या विस्ताराची चाचणी असते, खोलीची नाही. उत्तरासाठी शब्दांची मर्यादा लक्षात घेता, उमेदवारांनी त्या विषयाची त्यांची समज दर्शवणे आवश्यक आहे. “तुमचे उत्तर लिहिताना, नेहमी अनेक दृष्टीकोनांचा समावेश करा. उत्तर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असणे बंधनकारक आहे आणि तुम्ही दोन्हीचा उल्लेख करणे आवश्यक आहे.”

  1. प्रश्नाचे उत्तर न देणे –

प्रश्नाचे उत्तर देण्याच्या घाईत उमेदवार कधी कधी विचारलेला प्रश्न पूर्णपणे चुकतात. अनेक वेळा उमेदवार प्रश्नात नमूद केलेला महत्त्वाचा शब्द निवडतात. मग त्यांचे संपूर्ण उत्तर त्यावर आधारित असते. प्रश्नाकडे पाहण्याचा हा दृष्टीकोन अजिबात योग्य नाही. तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी विचारलेला प्रश्न वाचला आणि समजला आहे याची खात्री करा.

  1. आशय रचनेची कमतरता

उत्तरे लिहिताना उमेदवार कधी कधी चांगल्या रचनेचे महत्त्व विसरतात. उत्तरामधील सर्व संबंधित मुद्द्यांचा उल्लेख करणेच महत्त्वाचे नाही, तर तुम्ही तुमच्या उत्तराची रचना कशी करता ते देखील महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तराची सुरुवात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून करावी. असे केल्याने त्याचा चांगला प्रभाव पडतो. थोडक्यात उत्तर लिहिण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे हे ठरवणे गरजेचे आहे.

  1. आत्मनिरीक्षणाचा अभाव-

केवळ मॉक पेपर्सवर लक्ष केंद्रित करू नका तर तुमची उत्तरे आणि चुकांचे विश्लेषण करण्यात वेळ घालवा. उमेदवारांनी चुकांमधून शिकत राहणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version