मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. दिनांक 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात काल तुरळक पाऊस पडला. तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.