Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

केंद्र सरकार पूरग्रस्तांना मदत देणारच; विरोधी पक्षनेते

फडणवीस यांचा बारामती पाहणी दौरा केला

केंद्र सरकार तर मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल? केवळ टोलवाटोलवी करू नका अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार काय करणार आहे ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  सोमवारी श्री. फडणवीस यांनी बारामती तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 

फडणवीस म्हणाले, राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. सरकारने प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील.  राज्यपालांबरोबर यापूवीर्ही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नाही.  शेतकऱ्याला काय मदत मिळणार ,असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.  केंद्राची वाट न बघता राज्यानं मदत करावी,असा सल्ला देखील त्यांनी दिला.

सनसरमध्ये अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. घरातील भांडी रस्त्यावर पडली आहेत. तेथील नागरिकांशी संवाद साधला, तेव्हा म्हणाले रहायला जागा नाही, खायला काही नाही, सांगा आता जगायचे तरी कसे?  निमगाव केतकी येथे घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. याही भागाला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. खडकी येथील पुलाच्या आजूबाजूला शेती खचली.विजेच्या तारा शेतीत पडून आहेत. अजून कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून झालेली नाही. मळद गावातील (दौंड तालुका) पूल वाहून गेला, त्यामुळे गावाशी संपर्क तुटला.शेतीचे नुकसान, जनावरं वाहून गेली…८ दिवसांपासून वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, कुणी आजारी पडले तर दवाखान्यात जायला रस्ता नाही.  स्वामी चिंचोली येथे रस्ता पूर्णपणे खचला. पावसाची ही आहे तीव्रता. घरांचे नुकसान सुद्धा मोठे आहे. शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. माझी सरकारला विनंती आहे की याची तत्काळ दखल घ्यावी! असेही ते यावेळी म्हणाले.
Exit mobile version