राज्यात कापूस खरेदी 1 ऑक्टोबरपासून; डाळी तेलबियांच्या खरेदीला मंजुरी

2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगण आणि हरियाणा या राज्यांसाठी 13.77 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी

खरीप विपणन हंगाम 2020-21 ची आवक सुरु झाली असून सरकारने आधीच्या हंगामाप्रमाणे, सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार, शेतकऱ्यांकडून खरीप 2020-21 पिक खरेदी जारी ठेवली आहे.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार, 2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगण आणि हरियाणा या राज्यांसाठी  13.77 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. इतर राज्ये/केंद्र शासित प्रदेशांसाठी खरीपाच्या डाळी आणि तेलबिया यासाठी प्रस्ताव आल्यानंतर मंजुरी देण्यात येईल. बाजार भाव, किमान आधारभूत किमतीच्या खाली गेल्यास खरेदी किमान आधारभूत किमतीनुसार केली जाईल. 24.09.2020 पर्यंत केंद्र सरकारने नोडल एजन्सीद्वारे 34.20  मेट्रिक टन मुग खरेदी केली. त्याचप्रमाणे किमान आधारभूत किंमत 52.40 कोटी रुपये असलेल्या  5089 मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यात आली त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडू मधल्या 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला. आंध्रप्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळसाठी 95.75 लाख मेट्रिक टनची मंजुरी देण्यात आली होती.

2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी तांदुळाच्या खरेदीला नुकतीच 26 सप्टेंबर 2020 पासून सुरवात झाली असून 27.09.2020 पर्यंत 10,643 कोटी रुपये किमान आधारभूत किमत मूल्याचा आणि प्रती मेट्रिक टन 1868 रुपये किमतीचा  5637 मेट्रिक टन तांदूळ हरियाणा आणि पंजाबच्या 390 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. उर्वरित राज्यांसाठी तांदूळ खरेदीला 28.09.2020 पासून सुरवात होईल.

2020-21 च्या हंगामासाठी कापूस खरेदी 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु होईल आणि भारतीय कापूस महामंडळ एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीला 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरवात करेल.