Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

तरच पीएम किसानचा अकरावा हप्ता येईल खात्यावर…

पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्या खात्यात तो कधी येणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे? ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय एप्रिल-जुलैसाठी 2000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होईल का? असा प्रश्न अनेकांचा आहे.

पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी सुरू झाले आहे. पुढील हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल तर ३१ मार्चपर्यंत नक्कीच पूर्ण करा. जर आपण 11 व्या म्हणजे पुढच्या हप्त्याबद्दल बोललो, तर तो 31 मार्चच्या आधी येणार नाही. कारण, प्रत्येक आर्थिक वर्षात पुढील प्रकारे हप्ता दिला जातो.
1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान एप्रिल-जुलैचा हप्ता.
ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान.
डिसेंबर-मार्चचा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान.

अशी करा ई-केवायसी पूर्ण :
१. यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
२. उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा
३. आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
४. आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP टाका
५. जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल.
६. असे झाल्यास तुमचा हप्ता उशीर होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.

आता प्रतीक्षा ११ व्या हप्त्याची :
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील १२.४८ कोटींहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत. 31 मार्चपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्यासह डिसेंबर-मार्चचा हप्ता येणे सुरू राहील. पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ही रक्कम 10.22 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली आहे. तरीही कोट्यवधी शेतकरी यापासून वंचित आहेत.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये थेट ट्रान्सफर करते. आतापर्यंत सरकारने 10 हप्ते जारी केले आहेत आणि 11व्या साठी 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत. यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसी करावे लागेल.

Exit mobile version