Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पुरुषाच्या तुलनेत देशात स्त्रियांची संख्या वाढली

स्त्री पुरुष समानतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारत आता लिंग समानतेकडे वाटचाल करत असून देशात आता दर एक हजार पुरुषांमागे एक हजार वीस महिला आहेत. मात्र  प्रजनन दरही कमी झाला आहे, त्यामुळे लोकसंख्येचा स्फोट होण्याचा धोकाही कमी झाला आहे. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या आकडेवारीत या गोष्टी समोर आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 नोव्हेंबर रोजी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

NFHS मधून आलेली निरीक्षणे

भारतात तरुणांची संख्या मोठी आहे.

15 वर्षांखालील वयोगटातील लोकसंख्येचा वाटा 2019-2021 मध्ये 34.9 टक्क्यांवरून 26.5 टक्क्यांवर आला आहे.

प्रजनन दर कमी झाला आहे. मुलांची सरासरी संख्या २.२ वरून २ वर आली आहे.

गर्भनिरोधकांचा वापर ५४ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

ही एक महत्त्वाची घटना असल्याचे सांगून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक विकास शील म्हणाले की, जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर हेही एक महत्त्वाचे यश आहे. जनगणनेतून खरे चित्र समोर येणार असले, तरी आताची आकडेवारी पाहता आपण असे म्हणू शकतो की महिला सक्षमीकरणाच्या आपल्या उपाययोजनांनी आपल्याला योग्य दिशेने वाटचाल केली आहे.

नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या आकडेवारीनुसार, देशात आता पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता प्रत्येक 1000मागे 1020 महिला आहेत. 1990 च्या दरम्यान, दर 1000 पुरुषांमागे फक्त 927 महिला होत्या. वर्ष 2005-06 मध्ये, NFHS च्या आकडेवारीमध्ये महिला आणि पुरुषांची संख्या 1000-1000 होती. मात्र, त्यानंतर त्यात घट झाली. 2015-2016 मध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 महिला होत्या. मात्र, आता महिलांनी संख्येच्या बाबतीत पुरुषांना मागे टाकले आहे. तथापि, आपण राज्यनिहाय पाहिल्यास, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त असण्याची शक्यता आहे.

Exit mobile version