Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महाराष्ट्रात पावसाची शक्यता; मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 19 मार्च 2021 रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च 2021 रोजी लातूर, उस्मानाबाद व बीड  जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, तसेच परभणी, औरंगाबाद, जालना व  नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या शिवाय काही भागांत विजा आणि गारपीटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असे होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या रब्‍बी ज्‍वारी, हरभरा, गहु आणि करडई या पिकांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ही पिके काढणी केली असल्‍यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची  सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. सध्‍याच्‍या काळात हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.ऊस पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या द्राक्षांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडु नये म्‍हणुन झाडास आधार दयावा.

भाजीपाला पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. जनावरांच्‍या गोठयाच्‍या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराटयाचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

शरीरातील सर्व कामे व्यवस्थीत करण्याकरिता व आपल्या ऱ्हदयाचे ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाचीगरज असते. मिठामुळे च चांगली येते पण मिठाचा वापर कमी करावा. कारण जास्त मिठाचा वापर केल्याने रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात. जास्त मिठामुळे हाडातील कॅल्शीयमचे शोषण होते. जागतिक आरोग्य संघटना यांनी प्रति दिवस 5 ग्रॅम पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सुचविले आहे.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

Exit mobile version