निफाड : नासिक कडून येवला येथे जाणाऱ्या बस गाडीची चाके अचानक पणे निखळून मोठी दुर्घटना पडण्याची भीती होती परंतु बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस मधील 34 प्रवासी आणि दोन कर्मचारी अशा 36 लोकांच्या जीवावर चे संकट टळले.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,
शनिवार दि १४ रोजी दुपारी ३:३० वाजेचे सुमारास येवला आगाराची एम एच २० बि एल ०२३७ ही बस नाशिक हून येवल्याकडे जात होती. बत्तीस प्रवासी व चालक एम बी वाळुंज आणि महिला वाहक एच डी भोसले असे मिळुन बसमध्ये एकुण चौतीस व्यक्ती प्रवास करत होते. शिवरे फाट्याजवळ बस चालकाला आरशात मागील दोन चाके बसच्या बाहेर निखळत असल्याचे निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता बस चालक एम बी वाळुंज यांनी रस्त्यात बस थांबविली अन सर्व प्रवाशांना खाली उतरविले बसच्या खाली उतरुन प्रवाशांनी बसचे निखळलेले चाके पाहुन सुटकेचा निश्वास सोडला. चालकाचे सर्व प्रवाशी आभार मानत होते. प्रवाशांना पर्यायी बसने पुढे रवाना करण्यात आले.
अचानक बस थांबल्याने बसमधुन उतरुन पाहिले असता मागील उजव्या बाजुची चाके बसच्या बाहेर आली होती चालकाने वेळीच बस थांबविली नसती तर मोठा अनर्थ घडला असता चालकाच्या रुपाने देवच धावुन आला . जगन रायजादे- प्रवासी