कृषी हवामान सल्ला : दिनांक २० ते २४ जानेवारी २१

 मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. दिनांक २२ व २३ जानेवारी ,२०२१  रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात किमान तापमानात २ ते ३ अं.सें. घट होण्याची शक्यता आहे त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा फुले लागणे ते घाट्या लागणे अवस्थेत असून हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस २५ %  इसी २० मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ %  ४.५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व  पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.करडई पिक फुलधारणा अवस्थेत असून करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  डायमेथोट ३० % १३ मीली किंवा असिफेट ७५ %  १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात उपलब्धतेनुसार व  पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.ऊस पिक वाढीच्या अवस्थेत असून नवीन लागवड केलेल्या उस पिकाला १ ते १.५ महिना झाल्यानंतर नत्र खताची मात्रा दिली नसल्यास ३० किलो प्रती हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी पिक फुलधारणा अवस्था अवस्थेत असून आंबे बहार मोसंबी बागेत ५००:५००:५०० ग्राम प्रती झाड नत्र, स्पुरद व पालाश व आंबे बहार संत्रा बागेत ४००:४००:४०० ग्राम प्रती झाड नत्र, स्पुरद व पालाश खताची मात्रा देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब पिक फुलधारणा अवस्था अवस्थेत असून आंबे बहार डाळींब बागेत ३२५:२५०:२५० ग्राम प्रती झाड नत्र, स्पुरद व पालाश खताची मात्रा देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे .

चिकू पिक वाढीच्या अवस्थेत असून चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला पिके

कांदा पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  डायफेन्कोनॅझोल २५% ईसी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात स्टीकरसह मिसळून फवारणी करावी. मिरची पिकात भुरी रोगाचा  प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  मायक्लोब्युटनिल १०% डब्लूपी  १० ग्राम  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चारा पिक

रब्बी हंगामात पेरणी केलेल्या चारा पिकात पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन

मुरघास तयार करण्यासाठी योग्य पिकाची कापणी पिक फुलोऱ्यात असताना तसेच एकदल तृणधान्ये चारापिकाच्या कणसातील दान्यामध्ये दुध भरण्याच्या अवस्थेत करावी.मुरघास तयार करण्यासाठी एकदल तृणधान्य चारापिके ज्यामध्ये विद्राव्य शर्करा/कर्बोदके यांचे प्रमाण जास्त असते (म्हणजे त्यांचे कांडे चावल्यावर गोड लागते) अशी चारापिके योग्य मानली जातात.

सामुदायिक विज्ञान

स्वयंपाक करण्यासाठी सुर्यचुलीचा वापर करून इंधन बचत करता येते.  

 

 सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी