कांदा निर्यातबंदीमुळे भाव कोसळले; शेतकरी अडचणीत

नाशिक : 

लासलगाव बाजारसमितीत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता. आज दिनांक १४ सप्टेंबरला कांद्याने  तीन हजार उपायांचा चा टप्पा ओलांडला. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आज सायंकाळी कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी जाहीर केला. त्यामुळे देश अंतर्गत साठा वाढून भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा फटका सामान्य कांदा उत्पादकांना बसणार आहे.

मागील पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 45 टक्क्याने वाढ झाल्याने आजचा निर्णय जाहीर केला.  वाणिज्य मंत्रालयाने १५ मार्च २०२० रोजी कांद्यावरील निर्यातबंदी उठवत पुन्हा निर्यात खुली केलेली होती. मात्र आता त्यावर बंदी घातल्याने शेतकार्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने निर्यात होणारा कांदा हा मुंबई पोर्टवर,  तर बांगलादेश बॉर्डर वर दिवसभर रोखून धरल्याने या अघोषित निर्यात बंदी मुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला.  यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू ठेवावी आणि कांद्याच्या बाजारभाव कोसळतील असे कुठलेही निर्बंध लादू नये अन्यथा संपूर्ण राज्यभरात रस्ता रोको , रेल रोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे

अतिवृष्टीने श्रीलंकेतील नवीन कांद्याचे तर पाकिस्तान मधील साठवलेल्या कांद्याचे साधारणता ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नवीन येणारा कांदा हा बाजारात दखल झालाच नाही त्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील नवीन कांद्याच्या पिकाला ही फटका बसल्याने चाळीत साठवलेला कांद्याला मागणी वाढली आहे.

यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव हे तीन हजार रुपयांच्या वर गेले बाजार भाव वाढत असल्याने झालेले उत्पादन खर्च भरून निघणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र कांद्याचे वाढते बाजार भाव पाहता मुंबई पोर्ट वर मलेशिया, कोलंबो, दुबई सह इतर विदेशात निर्यातीसाठी 400 कंटेनर मधील 12 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकार असमर्थता दाखवल्याने पस्तीस कोटीहून अधिकचा कांदा हा खराब होण्याची भीती निर्यातदार व्यापार्यांकडून कडून व्यक्त केली जात आहे.