कृषि अधिकाऱ्यांना दिले खराब झालेले सोयाबीन भेट

नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये मदत द्या

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून खोडकीड्याने सोयाबीन पिक गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.तर शासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.

समुद्रपुर तालुक्यात ऐन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकावर खोडकीडीचा व बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भव झाल्याने अचानक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडून वाळायला लागले आहे.तर कित्येक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून पिक हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपयाची तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना खराब झालेले सोयाबीन पिक देऊन दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदन देते वेळी मनसेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चौधरी ,मनसे शेतकरी सेना वर्धा जिल्हाउपाध्यक्ष मनोज गिरडे ,समद्रपूर तालूका अध्यक्ष निलेश खाटीक उपाध्यक्ष वासुदेव वैरागडे, अमोल मेंढूले,कवडूजी ब्राह्मणे संदिप शिवनकर राऊल गाडवे अशोक डेकाटे व मनसे सर्व पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते